रत्नागिरी : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले.
Tag: स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह
सावरकर विचार जागरण सप्ताहाची रत्नागिरीत सांगता
रत्नागिरी : शोभायात्रा आणि पतितपावन मंदिरातील सहभोजनाने सावरकर विचार जागरण सप्ताहाची आज रत्नागिरीत सांगता झाली. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री उदय सामंत, पद्मश्री भिकुजी इदाते उपस्थित होते.
विनायका रे संगीत कार्यक्रमातून स्वा. सावरकरांना आदरांजली
रत्नागिरी : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या आघाडीच्या गायक जोडीने विनायका रे या संगीत कार्यक्रमातून स्वा. वि. दा. सावरकर यांना आदरांजली वाहिली.
वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांच्या विचारांचे जागरण
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतिकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटला.
रांगोळीतून उमटले सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग
रत्नागिरी : रांगोळीच्या विविध छटांमधून स्वा. सावरकरांच्या जीवनातील विविध प्रसंग रांगोळीकारांनी साकारले.
त्या तिघी नाट्यप्रयोगात उलगडल्या यशोदाबाई, यमुनाबाई, शांताबाई सावरकर
रत्नागिरी : यशोदाबाई, यमुनाबाई आणि शांताबाई सावरकर या तिन्ही व्यक्तिरेखा साकारत अभिनेत्री अपर्णा चोथे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ उभा केला.