एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ

मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

फिनोलेक्स, ‘मुकुल माधव’मुळे १७०० कुटुंबांची दिवाळी होणार आनंदमय

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने समाजातील १७०० गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे.

जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करू या; स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. परब यांचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आले. या आपत्तीच्या स्थितीतही शासन खंबीरपणे उभे आहे आणि या संकटावर मात करून जिल्ह्याला नव्याने उभे करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड अनिल परब यांनी आज (१५ ऑगस्ट) रत्नागिरीत केले.

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीदरम्यान अशी घ्या काळजी…

रत्नागिरी : आज १ जून २०२० पासून येत्या ४ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ येत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.