नवी मुंबई : कोकण रेल्वेवरील पाच गाड्या सोमवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) नियमित गाड्या म्हणून धावणार आहेत. करोनाच्या कालखंडात विशेष गाड्या म्हणून या गाड्या चालविल्या जात होत्या. आता त्या करोनपूर्व काळातील गाड्यांप्रमाणेच पूर्वीच्याच क्रमांकाने धावणार आहेत. तसेच त्यांचे तिकीटदरही करोनापूर्व काळानुसारच असतील, असे कोकण रेल्वेने जाहीर केले आहे.