‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!!

करोनाचा पहिला फटका पर्यटनाला बसला. या धक्क्यातून सर्वांत शेवटी सावरणारा व्यवसायही पर्यटनच असेल. पृथ्वीवरील सर्वच ठिकाणे सुंदर होती. आपण त्या सौंदर्यांचे अभयारण्य, पार्क, कृषी पर्यटन आदी तुकडे पाडले. हे तुकडे नीट सांभाळण्याची जाणीव करोनाने करून दिली आहे. चला तर मग, आपण ‘स्मार्ट खेडी’ घडवू या! पर्यटन वाढवू या!! रोजगार निर्मिती साधू या!!! आज (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिन. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading

कोकणातील मच्छीमारांसाठी ६५.१७ कोटींचे पॅकेज : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील ५४ हजार ५७३ सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. क्यार, महा चक्रीवादळांमध्ये झालेले नुकसान, तसेच करोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२६ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

Continue reading

चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

Continue reading