रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग खरंच कमी झालाय का? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्याने शोधण्याची वेळ आली आहे. आता असं वाटेल की करोना तर गेले १६ महिने आहे. मग आत्ताच असं काय झालं की याचं उत्तर शोधण्याची वेळ आली आहे? याचा विचार आज वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर करावा लागेल.