रायपाटणच्या शेतकरी समूहाचा एक हजार डझन हापूस आंबा एसटीतून औरंगाबादला

राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.

एसटीने कोकणातून मुंबई-पुण्यासह राज्यभरात पाठवता येतील आंबे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने करोनाच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेऊन मालवाहतूक सेवा सुरू केली आहे. २३ मे रोजी कोकणातील हापूस आंब्यांच्या १५० पेट्या घेऊन एसटीचा पहिला ट्रक बोरीवलीकडे रवाना झाला. दरम्यान, रत्नागिरीतून आज (२४ मे) मुंबईला आणि उद्या (२५ मे) पुण्याला एसटीचा मालट्रक आंबे घेऊन जाणार आहे.

२२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत.

रेल्वे फुकट पाहिजे; एसटी मात्र चौपट भाडे आकारणार

अडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.

रत्नागिरीतून आठ मेपासून एसटी सुरू; परवानगी मिळालेल्यांनाच प्रवास करता येणार

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमध्ये सवलत दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंतीनुसार उद्या (दि. ८ मे) राज्यातील मुंबई आणि पुणे वगळता इतर आठ जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी २५ एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.