रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणारी यावर्षीची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे होणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणारी यावर्षीची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे होणार आहे.
मुंबई : एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रातून पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले आहेत.
रत्नागिरी : राज्य शासनाच्या एकसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी काल (दि. १२ डिसेंबर) रात्री समाप्त झाली. या फेरीत १० संस्थांची नाटके सादर करण्यात आली.
एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१२ डिसेंबर २०२२) किनारा हे नाटक रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ सादर करणार आहे. हे प्राथमिक फेरीतील अखेरचे नाटक आहे. सागरामध्ये भरकटलेले जहाज कधी ना कधी किनाऱ्याला येतेच. मानवी जीवनात स्त्री हाच कुटुंबाचा किनारा असते. हे दाखविणारे हे नाटक जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले आहे.
एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (१० डिसेंबर २०२२) रात्र संपली, पण उजाडलं कुठं? हे नाटक रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्था सादर करणार आहे. पुरुषपात्रविरहित या नाटकात वैभवसंपन्न एका सच्छील गृहिणीची आणि पुत्रप्राप्तीनंतर तिला वेड लागल्याने संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या बहिणीची ही कथा आहे.
एकसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (९ डिसेंबर २०२२) मेलो, डोळो मारून गेलो हे नाटक कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ सादर करणार आहे. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना लोकशाही कशी अद्दल घडवते आणि लोकशाही पुर्स्थापित होऊन समाजव्यवस्थेचा कसा विजय होतो, हे या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.