२२ डिसेंबरपासून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आज (२१ डिसेंबर) बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच जानेवारी २०२१पर्यंत अशी संचारबंदी लागू राहील.

विनामास्क फिरणाऱ्या २५ टक्के लोकांमुळे समाजाला धोका : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील ७० ते ७५ टक्के लोक बाहेर फिरताना मास्क वापरताना दिसतात. उरलेले २५ टक्के लोक विनामास्क फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजाला धोका होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, मात्र जनतेची इच्छापूर्ती नाही – नारायण राणे

रत्नागिरी : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसाऩभरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून करोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (३० नोव्हेंबर) रत्नागिरीत केली.

करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

रत्नागिरीत प्लाझ्मा उपचार केंद्र सुरू; जिल्हा रुग्णालयात असे केंद्र झालेला पहिला जिल्हा

रत्नागिरी : करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र असलेल्या प्लाझ्मा थेरपीचे केंद्र आता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.