भुकेल्या दिव्यांगांना ‘सन्मानाने अन्न’ देण्यासाठी ‘आस्था’ची हाक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच टक्के दिव्यांग आहेत. त्यातील काहींना परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. अशांकरिता आस्था सोशल फाउंडेशन ‘सन्मानाने अन्न’ योजना येत्या एक जानेवारीपासून राबविणार आहे. त्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे, अशी हाक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. सुरेखा जोशी-पाथरे यांनी दिली आहे.

कोकण कट्टा संस्थेतर्फे बालग्राम प्रकल्पाला मदत

मुंबई : कोकण कट्टा या विलेपार्ले येथील विविध क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेने पेण (जि. रायगड) येथील ग्रामसंवर्धन संस्थेच्या वंचित मुलांसाठी सुरू केलेल्या बालग्राम प्रकल्पासाठी सुमारे बाराशे किलो धान्य, टी-शर्ट, शूज, चादरी आणि शालेय साहित्य दिले.

करोनाच्या सावटातही जपली ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा

पनवेल : करोनाच्या काळातही पनवेल तालुक्यातील मोहो गावाने ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपली आहे.