रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे नव्याने लागू केलेले सीआरएआरचे प्रमाण (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) किमान टक्केवारीच्या तिप्पट आहे. आर्थिकदृष्ट्या पतसंस्था अत्यंत बलवान असल्याचेच हे द्योतक आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
