स्वप्नांचा ऐन उमेदीत चुराडा होतो, तेव्हा मानवी मनाच्या संवेदना मूक होऊन जातात. मनातील साऱ्या इच्छा–आकांक्षा भोवऱ्याच्या वेगाने मेंदूला फिरवत राहतात. मनावर झालेल्या जबरदस्त आघातानंतर मेंदूवरील ताबा निघून गेलेल्या माणसाला आपण मनोरुग्ण असे म्हणतो. पण मनोरुग्ण असूनही कोणाजवळ हात पसरायचा नाही. कष्ट करून स्वतःचे पोट भरायचे, अशा भावना असणे म्हणजे ही बाटलीवाली बाई मनोरुग्ण होण्यापूर्वी संस्कारक्षम जीवन जगली असल्याचा पुरावाच म्हटला पाहिजे. समाजाने मनात आणले, अशा मनोरुग्णांना पुन्हा नक्कीच माणसात आणता येऊ शकेल.
