रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : वर्षअखेरीला कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक पर्यटक पाहुणे येतात. पण यावर्षी त्यातले काही पाहुणे आलेच नाहीत.
मंडणगड : तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने घरे अंशतः बाधित झालेल्यांसाठी निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. शासनाच्या
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील आपद्ग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासकरून अंशतः बाधितांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने भरपाईपासून वंचित राहणाऱ्या हजारो आपद्ग्रस्तांना भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.