आकाशवाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राज्यसभेचे सदस्य असले तरी कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकेंद्रीकरणाकरिता लक्ष घालणे अपेक्षित आहे. वेळीच धोरणात्मक सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाऐवजी स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ येऊ शकेल.
