काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकातर्फे दरमहा वाचक कट्टा कट्ट्याचे आयोजन

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारकाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उद्यापासून (दि. १४ जानेवारी) वाचक कट्ट्याचे आयोजन सुरू करण्यात येणार आहे.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकाचा दापोलीत शुभारंभ

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या १४२ व्या जयंतीचे औचित्य साधून जालगाव (ता. दापोली) येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या स्मारकाचा काल (दि. ७ मे) प्रारंभ झाला. जालगाव अपना स्वीट्सच्या इमारतीत मुख्य कार्यक्रम झाला.