स्वातंत्र्यावर मर्यादा हवी

लोकांनी आपल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये उपस्थित राहून काम करण्यासाठी निवडून दिलेले असते. सातत्याने सभात्याग करणे म्हणजे लोकांच्या मतांचा अनादर आणि त्यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. भलेही सरकारने मांडलेले मुद्दे पटत नसले, तरी त्यासाठी सभागृहातून बाहेर पडायलाच हवे असे नाही. किंबहुना लोकप्रतिनिधींनी सभागृहात उपस्थित राहणेच अत्यावश्यक आहे. ते सभागृहातील नियोजित कामकाजाच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वेळ सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर ती त्यांची अनुपस्थिती समजून खासदारकीच रद्द करण्याची तरतूद केली गेली पाहिजे.

सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.

सातवाहनकालीन अणुस्कुरा घाट परिसरात वृक्षारोपण

राजापूर : सातवाहन काळातील ऐतिहासिक व्यापारी मार्ग असलेल्या अणुस्कुरा घाटातील उगवाई मंदिर परिसरात राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ आणि पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि जंगल ट्रेल उपक्रम पार पडला.

उद्योगाच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनासोबतच साधनेचे अधिष्ठानही हवे : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे काल (२२ जून) विशेष सत्कार करण्यात आला. त्यात त्यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडून दाखवला.

‘पितांबरी’चे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा २२ जूनला रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे सत्कार

पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे येत्या रविवारी (२२ जून) विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

खरवते ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्तीवर लक्ष केंद्रित करावे – किरण सामंत

राजापूर : माजी वसुंधरा अभियानात चांगली कामगिरी बजावल्यानंतर आता खरवते ग्रामपंचायतीने संपूर्ण प्लास्टिकमुक्ती वर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.