ज्यांनी मतदान केले नाही त्यांनी एक तर विकास नाकारला आहे किंवा त्यांच्यापर्यंत विकास पोहोचलेला नाही. विकासाची कल्पना पोहोचलेली नाही. मतदान किती आवश्यक आहे, याची याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यामध्ये राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि प्रशासनसुद्धा अपयशी ठरले आहे. खऱ्या अर्थाने लोकांच्या मतांचा मागवा घेण्यात आलेले हे अपयश जेवढ्या लवकर धुऊन काढता येईल तेवढे, ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.