आणखी एक महामंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा लोककला महोत्सवात केली. आता यथावकाश हे महामंडळ स्थापन होईलच. महामंडळाची घोषणा केली किंवा ती प्रत्यक्षात आली तरी सारे काही झाले, असे नाही. कोकणापुरता विचार करायचा झाला तरी कोकणासाठी अनेक महामंडळे आतापर्यंत अस्तित्वात आली. काही बरखास्त झाली, तर अस्तित्वात असलेली महामंडळे बंद झाली नाहीत, म्हणून चालू आहेत, अशा अवस्थेत आहेत.

काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

‘लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’

चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.

संपूर्ण कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण आवश्यक : माधव भांडारी

चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.