बालसाहित्यिक मदन हजेरी यांना गोवंडे पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा कै. श्रीकांत गोवंडे बालवाङ्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

‘गणपत वाणी’मुळे चिपळूणचे नाव जगभर – एअरमार्शल हेमंत भागवत

चिपळूण : चिपळूणमधील साहित्य संस्थांनी आयोजित केलेल्या आगळ्यावेळ्या ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेमुळे चिपळूणचे नाव जगभर पोहोचले आहे, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत यांनी केले.

डॉ. आंबेडकर वाचनालयाचा रौप्य महोत्सव साहित्यिक कार्यक्रमांनी उत्साहात

चिपळूण : चिपळूण नगरपालिका पुरस्कृत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून झालेल्या विविध साहित्यिक कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

कोकणाविषयीच्या सकारात्मक साहित्यनिर्मितीची गरज – उदय सामंत

मांडकी-पालवण (ता. चिपळूण) : विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारे काही आहे. मात्र त्याचे सादरीकरण आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनी कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

ग्रंथदिंडी, ध्वज फडकवून ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

चिपळूण : मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे आज सायंकाळी ग्रंथदिंडी आणि संमेलनाचा ध्वज फडकवून तीन दिवसांच्या ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा थाटात प्रारंभ झाला.

सृष्टी वाचविण्याचा संदेश साहित्यिकांनी द्यावा : प्रा. सुहास बारटक्के

चिपळूण : धोक्यात आलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल समाजाला सांगण्यासाठी साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.