दिवाळीच्या दिवसांत परसातल्या उंबराच्या झाडावर फळं खाणाऱ्या तांबटाच्या जोडीचं सुखद दर्शनधीरज वाटेकर यांना घडलं आणि त्यांच्या फराळाचा सोहळा त्यांना अनुभवता आला, त्याबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दिवाळीच्या दिवसांत परसातल्या उंबराच्या झाडावर फळं खाणाऱ्या तांबटाच्या जोडीचं सुखद दर्शनधीरज वाटेकर यांना घडलं आणि त्यांच्या फराळाचा सोहळा त्यांना अनुभवता आला, त्याबद्दल त्यांनी लिहिलेला हा लेख…
राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे.
रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा बोलबाला सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, तसेच नव्याने जाहीर झालेल्या शैक्षणिक धोरणाला पूरक असे एक अॅप मूळच्या कोकणातील दोघा तरुणांनी विकसित केले आहे. प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर स्तरापर्यंत प्रामुख्याने ग्रामीण भागातील गैरसोयी लक्षात घेऊन शैक्षणिक विकासात मोलाची भर घालू शकेल, असे हे अॅप असून, सिद्धार्थ पाथरे आणि सौरभ सुर्वे या दोघा इंजिनीअर तरुणांनी तयार केले आहे. त्यापैकी सिद्धार्थ पाथरे हा तरुण तर आपल्या ज्ञानाचा भारतीयांना फायदा व्हावा, यासाठी अमेरिका सोडून भारतात परतला आहे.
रत्नागिरी : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त (१८ जून) दर वर्षी रत्नागिरीच्या कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी हा पुरस्कार चिपळूणची योगपटू स्वराली तांबे हिला जाहीर करण्यात आला आहे; मात्र या वर्षी करोना संकटकाळामुळे पुरस्कार वितरण समारंभ प्रलंबित ठेवण्यात आला आहे.