श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थी योग; गणपतीपुळ्यात विशेष बैठकीत झाले यात्रोत्सवाचे नियोजन

येत्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी असून, श्रावणात हा योग आल्याने विशेष महत्त्वाचा आहे. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यात या दिवशी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. त्याच्या नियोजनासाठीची बैठक सात ऑगस्टला सायंकाळी गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात झाली.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या; रत्नागिरीत प्रवेशोत्सव उत्साहात

सुमारे दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१६ जून) नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रचारासाठी सायकल फेरी

रत्नागिरी : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, असा प्रचार करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर हरित रत्नागिरी’चा संदेश घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आज सायकल फेरी काढून जनजागृती केली.