रत्नागिरीत पावसाचे थैमान; १२२ मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २८ तारखेला रत्नागिरीत मुसळधार वृष्टी अपेक्षित; २६पासून राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नाही.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अ‍ॅलर्ट

भारतीय हवामान विभागाने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

light art water space

पावसाचे पाणी पालथ्या घड्यावर

#RainwaterHarvesting #पर्जन्यजलसंचय

पाण्याचा उपसा करण्यासाठी विहीर खोदण्याकरिता अल्पदराने कर्ज मिळते, अनुदानही मिळते. पण पाणी साठविण्याकरिता अशी कोणतीच योजना नाही. तशी ती करावी, असेही कुणाला सुचलेले नाही. ते सुचले असते, तर प्रत्येक घर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकले असते. वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अल्पप्रमाणात का होईना, पण अटकाव झाला असता.

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १५ एप्रिल २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय वाचा पुढील लिंकवर…

देवरुखवासीयांच्या दसऱ्याच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी

करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी; जनजीवन विस्कळित

रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.