रत्नागिरीत ७ ऑक्टोबरपासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला

रत्नागिरी : पावस (रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे येथील वरच्या आळीतील अध्यात्म मंदिरात ७ ऑक्टोबरपासून स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमाला होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर, बचत गटांच्या प्रवर्तक सौ. नेहा जोशी-करंदीकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देण्यात येणार आहे.

अमावास्येला पेटवलेली ज्ञानज्योत; कुर्धे मराठी शाळा

वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्राबल्य असताना, रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावात १३० वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेच्या रूपाने ज्ञानज्योत पेटवली गेली ती सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी. त्या वेळची सामाजिक परिस्थिती पाहता ही घटना म्हणजे क्रांतिकारीच म्हटली पाहिजे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची माहिती देत आहेत त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता कुर्ध्यातल्याच राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असलेले उदय श्रीकृष्ण फडके…

महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करण्याचे आवाहन

रत्नागिरी : हिंदू धर्मातील पवित्र पितृपक्ष सुरू झाला असून महिला वृद्धाश्रमाला देणगी देऊन पितरांचे पुण्यस्मरण करावे, असे आवाहन पावस (ता. रत्नागिरी) येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमातर्फे करण्यात आले आहे.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीत मासिक प्रवचनमाला; ३०, ३१ जानेवारीला देवदत्त परुळेकरांचे प्रवचन

पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने मासिक व्याख्यान/प्रवचनमालेचा उपक्रम ३० जानेवारीपासून रत्नागिरीत सुरू होत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला दोन व्याख्याने किंवा प्रवचने आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील देवदत्त परुळेकर यांच्या प्रवचनांनी केला जाणार आहे.

स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवात बालकलाकारांचा ‘स्वराभिषेक’

पावस : ‘स्वराभिषेक’च्या बालकलाकारांनी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांच्या केलेल्या बहारदार गायनामुळे स्वामींच्या जन्मोत्सवात साक्षात स्वरांचा अभिषेक श्रोत्यांनी अनुभवला. कार्यक्रमातील दोन अभंगांना यातीलच कलाकारांनी संगीतबद्ध केले होते, हे विशेष.

संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत प्राजक्ता काकतकर, तन्वी मोरे, महेंद्र मराठेंची बाजी

रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडिलकर यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.