मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नाही.