बेतालपणाचा विक्रम

भारतीय जनता पक्षातून काँग्रेसकडे गेलेले आणि तेथे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध झाले होते. त्यांचा बेतालपणा इतका वाढला होता की त्यांना अलीकडे कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. काँग्रेसच्या वरिष्ठांनी मात्र या बेतालपणाची दखल घेतली आणि प्रदेशाध्यक्षपद हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केले. पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रारंभ केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्याच्या काळात त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामध्येच त्यांनी प्रचंड टीकेची हौस भागवून घेतली आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण कोणती पातळी गाठणार आहोत, याचे दर्शनच घडविले.

रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचा विजय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेतर्फे विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जिंकले. फक्त गुहागरची जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे.

गुहागरच्या निकालाचे भवितव्य खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी, दि. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची जिल्ह्याची अंतिम सरासरी ६५.२३ टक्के आहे. विशेष म्हणजे यावेळी गुहागर मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची आकडेवारी अधिक असल्यामुळे खऱ्या अर्थाने तेथील निवडणुकीचे भवितव्य महिलांच्याच हाती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख मतदार ३८ उमेदवारांमधून बुधवारी निवडणार ५ आमदार

रत्नागिरी : बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) विधानसभेसाठी होणार असलेल्या मतदानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ लाख ३९ हजार ६९७ मतदार ३८ उमेदवारांमधून पाच जणांची आमदार म्हणून निवड करणार आहेत.

निर्भय होई रे मना….

संपूर्ण महाराष्ट्रात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. मला वाटते, महाराष्ट्रातील मतदारांसाठी यापेक्षा मोठा सणाचा दिवस नसेल. हा सण कोणत्याही आणि कोणाच्या दडपणाखाली नाही, तर निर्भयपणे साजरा केला गेला पाहिजे.

भाग्य अपुले अपुल्या हाते…

जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.