प्रत्येक गाव व्हावे पुस्तकांचे गाव

संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

कवितेची राजधानी मालगुंड झालं पुस्तकांचं गाव; थाटात लोकार्पण

कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला.

कोमसापला नवी मुंबईत जागा देणार : मुख्यमंत्री

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सु. द. भडभडे यांच्या `अंतरंग`ला कोमसापचा पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे यांच्या अंतरंग या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. याशिवाय दोन वर्षांचे वाङ्मयीन पुरस्कार परिषदेने जाहीर केले आहेत.

‘कोमसाप’च्या प्रतीक्षेत साहित्यप्रेमी

कोमसाप या संस्थेत अजूनही असलेली धुगधुगी वाढवायची असेल, तर अशा छोट्या संमेलनांबाबत कोमसापने पुन्हा एकदा विचार करायला हवा.
……..
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २ै२ एप्रिल २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय वाचा पुढील लिंकवर…

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (११ जानेवारी २०२१) नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष वास्तुविशारद संजय पाटील स्मारक समितीचे अॅड. विलास लोणारी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.