रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे आज (१९ जून) भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या १९६ वर्षांच्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार आहे. याचा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.
शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.
ते रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही. लोक कंटाळतात आणि तक्रार करायचे थांबतात. नंतर त्यांनाही त्याची सवय होते आणि लोकांच्या अल्पस्मृतीचीच ही सवय शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांना माहीत असते. अनेक वर्षे हे असेच सुरू आहे. यापुढेही तसेच चालणार आहे. विघ्नहर्ता आला. त्याच्यासोबत सण साजरा करून गणपती गावाला जाईल, चाकरमानी मुंबईला परततील. रस्त्यांमधील खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे.