लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात पार पडलेल्या पहिल्या ऐतिहासिक सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लांजा : तालुक्यातील माचाळ या थंड हवेच्या ठिकाणी उद्या (दि. ११ मार्च) सायंकाळी सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात सार्वजनिक स्वरूपात प्रथमच होणार असलेल्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
लांजा : लांजा तालुक्यातील स्वर्गीय सुंदर माचाळ गावात पर्यटन बहरावे या हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे येत्या शनिवारी (दि. ११ मार्च) सापड लोककला व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. एक विशिष्ट उद्देश ठेवून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उद्देशाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे केवळ सादरीकरणाच्या मर्यादेत न राहता कोकणातील सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाचनालयाला पुढाकार घ्यायला लावून असा महासंघ स्थापन करायला हवा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा लोककला महोत्सवात केली. आता यथावकाश हे महामंडळ स्थापन होईलच. महामंडळाची घोषणा केली किंवा ती प्रत्यक्षात आली तरी सारे काही झाले, असे नाही. कोकणापुरता विचार करायचा झाला तरी कोकणासाठी अनेक महामंडळे आतापर्यंत अस्तित्वात आली. काही बरखास्त झाली, तर अस्तित्वात असलेली महामंडळे बंद झाली नाहीत, म्हणून चालू आहेत, अशा अवस्थेत आहेत.
चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.