मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग आहे. अत्यंत खडतर काळापासून अत्याधुनिक सोयीसुविधांपर्यंत वृत्तपत्रांचे स्थित्यंतर झाले आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे. पण लोकशिक्षणाचे काम वृत्तपत्रांनी यापुढेही व्रत म्हणून केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.