वृत्तपत्रांनी लोकशिक्षणाचे काम व्रत म्हणून सुरू ठेवावे –  भगतसिंग कोश्यारी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग आहे. अत्यंत खडतर काळापासून अत्याधुनिक सोयीसुविधांपर्यंत वृत्तपत्रांचे स्थित्यंतर झाले आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे. पण लोकशिक्षणाचे काम वृत्तपत्रांनी यापुढेही व्रत म्हणून केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

रत्नागिरी : येथील दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट देऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२५ ऑक्टोबर) केले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.