दुर्मीळ होत चाललेल्या सुंदर दीपकॅडी वनस्पतीचे महत्त्व

कोकणातील पहिला दीपकाडी महोत्सव ५ ऑगस्ट २०२२ रोजी देवरुखमधील मातृमंदिर संस्थेने आयोजित केला आहे. दीपकॅडी कोंकनेन्स असे शास्त्रीय नाव असलेल्या एकदांडी या कोकणातील कातळसड्यावर फुलणाऱ्या वनस्पतीचे मोजकेच अधिवास आता शिल्लक राहिले आहेत. त्यात देवरुखमधील साडवलीचा समावेश आहे. तिथे सध्या या वनस्पतीला बहर आला आहे. याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, या वनस्पतीच्या संवर्धनाबद्दल संशोधन केलेले डॉ. अमित मिरगळ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तिथे उपस्थित राहणार आहेत. या वनस्पतीचे नेमके महत्त्व काय आहे, हे उलगडून सांगणारा डॉ. मिरगळ यांचा हा लेख…

ग्रामपंचायतीचे लोकजैवविविधता संकेतस्थळ : देशातील पहिला प्रयोग कोकणात

राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्याची दखल महाराष्ट्र राज्य जैवविविधतता महामंडळाने घेतली. आंतरराष्ट्रीय जैवविविधतता दिवसाचे औचित्य साधून अणसुरे ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारी ग्रामपंचायत म्हणून गौरव केला. त्यानिमित्ताने या गावाने राबविलेल्या प्रयोगाविषयी.

‘कोकणातील कातळसडे, खाजणे आणि देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक आढळ’

आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी किनाऱ्यावरील खाजण वने आदींसह कातळसडे आणि देवराया हा वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचा अधिवास असल्याचे प्रतिपादन देवरूख (संगमेश्वर) येथे, आपल्या परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे केले. वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावरील वेबिनार व्याख्यानात मोरे बोलत होते.

आंबोलीतील जैवविविधतेबद्दल ‘निसर्गरंग’च्या ऑनलाइन कट्ट्यावर गप्पा; रविवारी पाच वाजता

आंबोलीच्या या सगळ्या जैवविविधतेची ओळख करून घ्यायची असेल, तर ‘निसर्गरंग’च्या कट्ट्यावर आज (चार ऑक्टोबर २०२०) सायंकाळी पाच वाजता जरूर सहभागी व्हा. तरुण वन्यजीव अभ्यासक अनीश परदेशी या कट्ट्यावर गप्पा मारणार असून, या जैवविविधतेची ओळख करून देणार आहेत.

सिंधुदुर्गातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र तिलारीत; जैवविविधता संवर्धनासह इको टुरिझमला चालना

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र असून, पश्चिम घाटातील १३वे संरक्षित क्षेत्र झाले आहे. त्यामुळे जैवविविधता संवर्धनासह इको टुरिझमला चालना मिळणार आहे.