मंडणगड पंचायत समितीचा पाच एकर हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प

पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा नावीन्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. इतर तालुक्यांसाठीही तो आदर्शवत आहे.

भात, नाचणीच्या कापणीनंतर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती

पालघर : मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार-मोखाड्यातील शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भातशेती आणि नाचणी शेतीला बगल देत किंवा भात आणि नाचणीच्या कापणीनंतर तेथील शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न मिळत आहे.

काजू उद्योजकांना आयात काजूची भीती नको – डॉ. परशराम पाटील

लांजा : भारतीय काजूगराची चव, स्वाद पाहता भविष्यात भारतीय काजूची मागणी वाढतीच राहणार आहे. भारतीय उद्योजकांनी आयात होणाऱ्या काजूची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे उद्गार भारत सरकारच्या कॉमर्स मंत्रालयाचे स्टार्ट अप इंडिया आणि आशियाई विकास बँकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी काढले.

पालघर जिल्ह्यातील `श्रीमंत` शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याचे आदेश

पालघर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेनुसार अनेक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. मात्र योजनेतील निकषात न बसलेल्या, तसेच निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असून आयकर भरणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांना अनुदान परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील अनेक शेतकऱ्यांनी अनुदान परत केले आहे.

नारळ उत्पादक नोंदणीविषयीचा संदेश फसवणूक करणारा

रत्नागिरी : कोकण नारळ विकास मंचाच्या नावे नारळ उत्पादकांची नोंदणी करण्याविषयीचा संदेश सध्या व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होत आहे. नावनोंदणीची मुदत येत्या २५ डिसेंबरपर्यंत असून किमान १५० ते जास्तीत जास्त दीड लाखाचे अनुदान मिळण्यासाठी गुगल लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये ईमेल किंवा संपर्क क्रमांक, तसेच कोणत्याही व्यक्तीचे नाव दिले गेलेले नाही. अशी अनुदानाची कोणतीही योजना नसल्याचे शासकीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

कोकणातील नुकसानग्रस्त बागायतदारांनी कंदपिके घ्यावीत; कोकण कृषी विद्यापीठाचे आवाहन

दापोली : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील बागायतदारांनी त्वरित उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने कंदपिके घ्यावीत, असे आवाहन दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.