नवी ऊर्जा देणारा कोकणातला गणेशोत्सव

ग-ण-प-ती या चार अक्षरांभोवती कोकणी माणसाचं धार्मिक, आध्यात्मिक, भावनिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, कला आणि श्रद्धा अशा अनेक प्रकारचं विश्व फिरत असतं.

गणेशोत्सवातील विरोधाभास

एकत्र न येणारा समाज उत्सवाच्या निमित्ताने आजही एकत्र येत असेल, तर त्याला नवे वळण, नवी दिशा देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागेल.

गणेशोत्सवाबाबत लवकरच स्थानिक समित्यांद्वारे निर्णय

रत्नागिरी : मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची शासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाणार असून गणेशोत्सवाबाबत लवकरच स्थानिक समित्यांद्वारे निर्णय घेतला जाईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यंदा गणेशमूर्तींची उंची तीन फुटांपर्यंतच : उदय सामंत

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींची उंची जास्तीत जास्त तीन फुटांपर्यंतच ठेवायचा निर्णय झाला आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.