रत्नागिरी : राज्य शासनाने करोना प्रतिबंधासाठी गेल्या २१ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार एसटी तसेच खासगी बसमधील प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. प्रवासी बस थांब्यावर उतरताच त्याच्या हातावर १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा शिक्का मारावा, असे आदेशात म्हटले आहे. कोणा प्रवाशाची करोनाविषयक आरटीपीसीआर करावयाची झाल्यास त्याचा खर्च प्रवाशाला करावा लागणार आहे.
