‘ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूंना मूँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्कराच्या हातात भविष्यात आपल्या रत्नागिरीत तयार होणारी शस्त्रे असतील, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. ते आज देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.