पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

माचाळ : दोनशे वर्षांपूर्वीच्या गावाची जितीजागती प्रतिकृती

रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या आणि एकविसाव्या शतकातही दोनशे वर्षांपूर्वीचेच गावपण जपणाऱ्या माचाळ गावाचा परिचय करून देणारा लेख.

कळंबस्ते ग्रामस्थांच्या मदतीला धावले मुंबईकर

रत्नागिरी : कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथील मलदेवाडीतील मुंबईकर चाकरमानी ग्रामस्थांच्या मदतीला धावले आहेत. करोनाच्या काळात आवश्यक असलेली विविध उपकरणे आणि साधनांचे त्यांनी घरोघरी वाटप केले.

माचाळच्या शेतकऱ्यांना पावसाळी बीबियाण्यांचे मोफत वाटप

लांजा : माचाळ मुचकुंदी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेने माचाळ गावातील शेतकऱ्यांना पावसाळी भाजीपाल्याचे नऊ प्रकारचे बीबियाणे पुरविले. त्याचे वितरण खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत झाले.