कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

विवाह आणि अन्य कार्यक्रमांना फक्त ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकणार; राज्यात नवे कोविड निर्बंध लागू

राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

रत्नागिरी जिल्ह्यात आता दर शनिवार-रविवारी लॉकडाउन

ना प्रतिबंधासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये १० जूनपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आता यापुढे दर शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाउन असेल, तर इतर दिवशी सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत पूर्ण संचारबंदी लागू राहील.

राज्यातील लॉकडाउन १५ मेपर्यंत

मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात सध्या सुरू असलेले लॉकडाउन येत्या १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश आज सायंकाळी जारी केले.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत २२ एप्रिलला रात्री आठपासून लागू होणारी सुधारित नियमावली

कोविड-१९च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे, असा विचार करून राज्य सरकारने साथरोग नियंत्रण कायदा १८९७मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू करायचे ठरवले आहे. या उपाययोजना २२ एप्रिल २०२१च्या रात्री आठ वाजल्यापासून १ मे २०२१च्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील, असे सरकारतर्फे कळवण्यात आले आहे.