रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.
