रत्नागिरीत चक्रीवादळाने साडेतीन लाख ग्राहक अजूनही विजेविना; जिल्ह्यात किमान एक हजार घरांचे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.

Continue reading

भाजपतर्फे रत्नागिरीत वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन; राज्य सरकारचा धिक्कार

रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.

Continue reading

वाढीव वीजबिलमाफीसाठी २३ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे आंदोलन

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे चार तालुक्यांमध्ये आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनाचाच हा एक भाग आहे.

Continue reading

वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा

मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Continue reading

वीजबिल अधिक आले आहे असे वाटते का? तुम्हीच पाहा पडताळून..

रत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या दिले जात असलेले बिल अतिरिक्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिल समजून घ्यावे. कोणाही ग्राहकाला आपले बिल पडताळून पाहता येईल, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

Continue reading

लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे वीजबिल एकत्रित

मुंबई : लॉकडाऊन काळात बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरू करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारी सवलतही (स्लॅब बेनिफिट) देण्यात आली असून, ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Continue reading

1 2