सेवा दलाची पंचतत्त्वे घराघरात पोहोचावीत : शहाजीराव खानविलकर

राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.

ओणी येथे एप्रिलअखेर राष्ट्र सेवा दलाची दोन शिबिरे

राजापूर : राष्ट्र सेवा दलाच्या ओणी (ता. राजापूर) शाखेतर्फे दस्तनायक आणि समाजभान युवा अशी दोन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येत्या २३ ते ३० एप्रिल या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत.

गावकऱ्यांनी पाठविलेल्या धान्याचे मुंबईच्या चाकरमान्यांना वितरण

रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.