राजापूरचे अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांचे निधन

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे १६ जानेवारी रोजी सायंकाळी गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले.

बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची गरज : कुमार केतकर

‘कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.

कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीपासून ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रिंगणे (ता. लांजा) येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे माजी संपादक, माजी खासदार कुमार केतकर भूषवणार आहेत.

तीस जानेवारीपासून रिंगणे येथे अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

राजापूर पालिकेवर एका मताने महाविकास आघाडीची सत्ता

राजापूर : राजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला एका मताने सत्ता प्रस्थापित करता आली. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी महायुती आणि महाआघाडीला प्रत्येकी १० जागा मिळाल्या, तर नगराध्यपदी काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे निवडून आल्याने सत्ता महाविकास आघाडीकडे गेली.

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी यांची अपक्ष उमेदवारी

प्रभाग क्रमांक एकमधून मिलिंद दत्तात्रय साळवी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.