धन्वंतरीचे दूत – आडिवऱ्याचे डॉ. भाऊकाका जोशी

आडिवरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील जुन्या पिढीतील नामवंत वैद्यकीय व्यावसायिक आणि सच्चे सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाऊकाका जोशी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सुहृद रविकिरण गजानन भिडे यांनी त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी लिहिलेला हा लेख…

गृह विलगीकरण सात दिवसांचे करावे; चाकरमान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गृह विलगीकरण १४ दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे करावे, अशी मागणी करणारे निवेदन चाकरमान्यांतर्फे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

राजापूर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी आणि पत्नी करोनाबाधित

रत्नागिरी : काल (५ जुलै) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार राजापूरमधील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत राजापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. आता राजापूर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ वर गेली असून, राजापूर ग्रामीण रुग्णालयातील एकूण ३५ कर्मचाऱ्यांना आज क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा सुरू

रत्नागिरी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार श्री. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून, कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रकल्प समर्थकांकडून केले जात आहे.

करोना लॉकडाऊनमध्ये ‘या’ कुटुंबाने विहीर खोदून पाणीप्रश्न सोडवला

राजापूर : करोनातील लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करीत राजापूरमधील बंगलवाडीतील जाधव कुटुंबीयांनी श्रमदानातून ५६ फूट खोल विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. करोना आपत्तीकडे संकट म्हणून पाहिले जात असताना जाधव कुटुंबीयांनी त्या संकटाला संधी म्हणून पाहत स्वयंप्रेरणेतून महिनाभर राबून विहीर खोदली. त्यांनी कष्टपूर्वक पाणीटंचाईवर केलेली मात इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.

सार्वजनिक महापूजेनिमित्त लाकडी वस्तूंचे प्रदर्शन; आडिवऱ्याच्या नांदगावकर बंधूंचा अनोखा उपक्रम

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे-नवेदरवाडीतील नांदगावकर सुतार बंधू यांची सालाबादप्रमाणे होणारी श्री सत्यनारायण महापूजा यंदा ११ मार्च २०२० रोजी झाली. यंदा पूजेचे ६४वे वर्ष होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कारागीरांनी बनविलेल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त अशा लाकडी वस्तूंचे प्रदर्शन हा सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरला.