२५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत परशुराम घाट बंद

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरचा चिपळूणजवळचा परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे २०२३ या कालावधीत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

परशुराम घाटातून आता दिवसा अवजड वाहनांची एकेरी वाहतूक; रात्री घाट पूर्ण बंद

रत्नागिरी : दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू ठेवण्याचे आणि रात्री घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (१४ जुलै) जारी केले आहेत. हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

परशुराम घाट आता १३ जुलैपर्यंत बंद राहणार

परशुराम घाट आता १२ जुलैच्या मध्यरात्री २४ वाजेपर्यंत म्हणजेच १३ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणीपातळी, वाहतुकीपासून इमर्जन्सी नंबर्सपर्यंत… सारी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर; राज्यात सर्वप्रथम रत्नागिरीत उपक्रम सुरू

कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पाणीपातळी, रस्ते वाहतूक आदी सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ताजी माहिती नागरिकांना अगदी सहज म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून क्षणात प्राप्त करता येणार आहे.

परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक १० जुलैपर्यंत बंद राहणार

पाच जुलै रोजी पुन्हा एकदा दरड खाली येऊन परशुराम घाटातली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आता ती १० जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे.

अधिक पावसाची शक्यता वर्तविल्यास परशुराम घाट बंद राहणार

रत्नागिरी : पावसाळा सुरू होत असून पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाट तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे.