सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाचे सिंधुदुर्गात एकाच दिवशी ठिकठिकाणी अनोखे प्रकाशन

माणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले.

सिंधुसाहित्यसरिता – काठावरचेच ओठावर…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आज, देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात प्रकाशित केली. (पुस्तक खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) त्या निमित्ताने, पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांचे हे मनोगत…

आमच्या परगण्यात आम्हीच शासन

दोन-दोन परगण्यांची जहागिरी सांभाळणे तसे काही सोपे नाही. आम्ही शासन आहोत हे पदोपदी सांगावे लागते, पण सांगण्यापेक्षा कृतीवर आमचा भर अधिक आहे. त्यामुळे राज्याचे सारे सैनिक आपापल्या ठिकाणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत का, याची पाहणी आम्हाला अधूनमधून करावी लागते. कधी आम्हाला बहिर्जी नाईक यांची आठवण होते, तर कधी शिवप्रभूंची. पण आठवणीत रममाण होण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणावेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करतो.

अशा रंगल्या बोली-गजाली (व्हिडिओ)

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१९च्या दिवाळी अंकात घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा २९ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत पार पडला. या निमित्ताने बोली-गजाली हा अनौपचारिक गप्पांचा फड रंगला. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि संगमेश्वरी बोलीतील नामवंत लेखक गिरीश बोंद्रे यांनी आपापल्या बोलींत केलेल्या गावाकडच्या गजालींनी कार्यक्रम रंगत गेला.