भाजपतर्फे रत्नागिरीत वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन; राज्य सरकारचा धिक्कार

रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.

Continue reading

वाढीव वीजबिलमाफीसाठी २३ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे आंदोलन

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे चार तालुक्यांमध्ये आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनाचाच हा एक भाग आहे.

Continue reading

वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा

मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Continue reading

वीजबिल अधिक आले आहे असे वाटते का? तुम्हीच पाहा पडताळून..

रत्नागिरी : महावितरणतर्फे सध्या दिले जात असलेले बिल अतिरिक्त असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिल समजून घ्यावे. कोणाही ग्राहकाला आपले बिल पडताळून पाहता येईल, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ पैकी ४६ वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत

रत्नागिरी : काही तासांसाठी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागातील वीजयंत्रणाच भुईसपाट केली. गेले बारा दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे बाधित ४७ उपकेंद्रांपैकी ४६ उपकेंद्रे सुरू झाली असून, राहिलेल्या एकमेव केळशीफाटा (ता. मंडणगड) उपकेंद्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आतापर्यंत तीन लाख ८५ हजार ६२३ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Continue reading

एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरणने उजळविले निराधार वृद्धेचे आयुष्य

रत्नागिरी : करोनाच्या लढ्यात जनतेला घरी थांबायला सांगण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक त्या सुविधा पुरवायला प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाचाच एक भाग असलेली आणि अखंड वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेली महावितरण कंपनी किती सज्ज आहे, याची चुणूक कंपनीने दाखवून दिली आहे. एका निराधार वृद्धेला एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरण कंपनीने आपली सज्जता सिद्ध केली आहे.

Continue reading