उद्याचे जबाबदार नागरिक घडवायचे असतील, तर लहान वयातच त्यांना योग्य ध्येयांची दिशा मिळायला हवी. तसेच, त्या दिशेने जाण्याचा दृढ संकल्प केल्यास त्यांची वाटचाल सुकर होते. म्हणून संकल्पाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसण्याकरिता रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता १८ जुलै २०२६ रोजी संकल्पदिन साजरा करण्यात आला.