आरवलीच्या श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव २५ एप्रिलपासून

आरवली : आरवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री देव आदित्यनारायण देवस्थानाचा १४७वा वर्धापनदिन उत्सव वैशाख शुद्ध पंचमी ते सप्तमी (२५ ते २७ एप्रिल २०२३) या कालावधीत होणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Continue reading

संगमेश्वरातील ४०० वर्षांचा इतिहास असलेली नवरात्रातील तुणतुणे परंपरा

कोकणात, खासकरून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात नवरात्रौत्सवात नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. शहाजीराजांनी सुरू केलेली ही परंपरा सरवदे समाजाने गेली ४०० वर्षं निष्ठेनं जपली आहे. इथून पुढच्या काळात मात्र ती लुप्ततेच्या मार्गावर आहे. या परंपरेविषयी…

Continue reading

एकदाही निवडणूक न झालेल्या पांगरी ग्रामपंचायतीचा ३० डिसेंबरला सुवर्णमहोत्सव

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या पांगरी-घोडवली-चांदिवणे या ग्रुप ग्रामपंचायतीचे १९७१ मध्ये विभाजन झाले आणि स्वतंत्र पांगरी ग्रामपंचायत स्थापन झाली. या वर्षी या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. या पन्नास वर्षांत एकदाही निवडणूक न झालेली ग्रामपंचायत अशी या ग्रामपंचायतीची ख्याती आहे.

Continue reading

मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याने केली ७० करोनाबाधितांची शुश्रूषा

चिपळूण येथील एक मर्चंट नेव्ही अधिकारी अस्लम मालगुंडकर स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून करोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहे. आतापर्यंत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७० करोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या जेवणखाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

Continue reading

ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शेकासन यांचे निधन

संगमेश्वर : गेली ४५हून अधिक वर्षे आपल्या लेखणीने समाजाभिमुख पत्रकारिता चळवळ जागृत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते डॉ. एम. डी. शेकासन (७४) यांचे आज (नऊ ऑक्टोबर २०२०) रत्नागिरीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Continue reading

मुंबई-गोवा महामार्ग १० ते १२ सप्टेंबरपर्यंत काही काळ बंद

राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे.

Continue reading

1 2