बोलीभाषा चळवळीचे सूतोवाच

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने राजापूर तालुक्यातील तळवडे या गावी आठवे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी बोलीभाषा टिकवून ठेवणे किती आवश्यक आहे, याबाबतचे विचार मांडले. बोलीभाषेतून स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडत असते. म्हणूनच बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे स्थानिक संस्कृतीचे संवर्धनही असते.

लोककलांचा महासंघ व्हावा

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. एक विशिष्ट उद्देश ठेवून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उद्देशाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे केवळ सादरीकरणाच्या मर्यादेत न राहता कोकणातील सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाचनालयाला पुढाकार घ्यायला लावून असा महासंघ स्थापन करायला हवा.

उत्सवांचे व्हावेत लोकोत्सव

उत्सव आणि यात्रांचे लोकोत्सवात रूपांतर झाले, तर स्थानिक उद्योजकता निर्माण होईल. प्रत्येक गावाचे काहीना काही वैशिष्ट्य असते. कोकणातील प्रत्येक गाव अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ती परिपूर्णता सार्वजनिक स्वरूपात लोकोत्सवातून प्रकट झाली, तर त्याचा कितीतरी लाभ सर्वांनाच होऊ शकेल.

आणखी एक महामंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील लोककलांसाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा लोककला महोत्सवात केली. आता यथावकाश हे महामंडळ स्थापन होईलच. महामंडळाची घोषणा केली किंवा ती प्रत्यक्षात आली तरी सारे काही झाले, असे नाही. कोकणापुरता विचार करायचा झाला तरी कोकणासाठी अनेक महामंडळे आतापर्यंत अस्तित्वात आली. काही बरखास्त झाली, तर अस्तित्वात असलेली महामंडळे बंद झाली नाहीत, म्हणून चालू आहेत, अशा अवस्थेत आहेत.

स्थलांतर रोखणाऱ्याही नोकऱ्या हव्यात

कोकणात कोकणाचे प्रश्न असतील, तसेच विदर्भात विदर्भाचे म्हणून काही प्रश्न असतील, मराठवाड्याचेही काही प्रश्न असतील. सर्वच ठिकाणी स्थानिक उद्योगांना, लघुउद्योगांना गरज असलेल्या तरुणांची उपलब्धता करून देण्यासाठीही उद्योग विभागाने तसे अभियान राबवायला हवे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच या छोट्या उद्योगांनाही कामगार-कर्मचाऱ्यांची गरज असते. ती स्थानिक स्वरूपातच भागविली गेली, तर स्थलांतर रोखले जाईलच, पण त्याचबरोबर त्या त्या स्थानिक उद्योगांची आणि पर्यायाने त्या विभागाचीही भरभराट होईल. हा समन्वय साधला जाणे आवश्यक आहे.

दिशाभूल करणाऱ्या सूचना

अनेक खाद्यपदार्थांच्या जाहिरातीही दिशाभूल करणाऱ्याच असतात. जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनी एखादे उत्पादन किंवा सेवा वापरली किंवा अनुभवली नसेल तर त्यांनी त्याचे समर्थन करता कामा नये, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात जाहिरातीतील हीरो कोणत्या वस्तू वापरतात? एकंदरीत जाहिरातींना वेसण घालण्यासाठी जारी केलेल्या सूचनाच मुळात दिशाभूल करणाऱ्या आहेत.