तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात मोठे नुकसान

सिंधुदुर्गनगरी : तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. अनेक घरांची पडझड होऊन छपरे उडून गेली आहेत. विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पहाटे चार वाजता त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटे चार वाजल्यापासून तौते चक्रीवादळ

सिंधुदुर्गनगरी : अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात रविवारी, १६ मे रोजी दाखल होत आहे. पहाटे ४ वाजता ते जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार असून दुपारी २ वाजल्यानंतर ते जिल्ह्यातून पुढे जाईल. या काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.