… तर ॲन्टीजेन टेस्ट करूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्याकरिता करोनाप्रतिबंधात्मक लशीच्या दोन मात्रा किंवा प्रवेशापूर्वी ७२ तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत नसल्यास अशा प्रवाशांची मोफत रॅपीड अँटिजेन तपासणी केली जाईल. तशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.

तौते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींची नुकसानभरपाई

रत्नागिरी : अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीसाठी कोकणवासीयांना प्राथमिक टप्प्यात २५२ कोटींची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

चक्रीवादळाचे नुकसान १०० कोटीचे, सरकार दाखवते ८-१० कोटी!

रत्नागिरी : कोकणात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने किमान १०० कोटीचे नुकसान झाले आहे. सरकार मात्र ८ ते १० कोटीचे नुकसान दाखवून फसवणूक करत आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली.

कोकणातील विजेच्या तारांना जालन्यातील खांबांचा आधार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे निर्माण झालेला वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी राज्याच्या इतर भागातूनही साहित्य आणले जात आहे. आज जालना येथून खां आणि ट्रान्स्फार्मर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महावितरणने सुरू केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

कवित्व वादळानंतरचं!

तोक्ते चक्रीवादळाने कोकणचा निरोप घेतला.. अशा निसर्गप्रकोपानंतरची परिस्थिती भीक नको पण कुत्रा आवर, अशी होऊन जाते. प्रातिनिधिक पाहणी करून जर सगळ्या नुकसानाची कल्पना येत असेल तर पंचनामे पण अशा प्रातिनिधिक पाहणीवरच केले जातात का? नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जे धोरणात्मक उपाय करायला हवेत, त्यातले किती उपाय या मंडळींकडून सांगितले जातात?