रत्नागिरी होणार पहिला नवप्रवर्तन जिल्हा; सिंधुदुर्गात तीन वर्षांत ताज ग्रुपचे हॉटेल

रत्नागिरी : ‘रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर ठरावा, यासाठी तो इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२७ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन वर्षांत फाइव्ह स्टार हॉटेलच्या पहिल्या टप्प्यातील १२० खोल्या उभारण्याबाबतचा सामंजस्य करार आज झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दीपगृह पर्यटन विकसित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

नवी दिल्ली : देशभरात असलेली सुमारे १९४ दीपगृहे ही पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्रे म्हणून विकसित करण्याबद्दल आज (सात जुलै) केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. दीपगृहांचा परिसर विकसित करण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

राज्यातील हॉटेल्स, लॉज आठ जुलैपासून सुरू होणार

राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळून हॉटेल, लॉज, अतिथीगृहांना आठ जुलैपासून क्षमतेच्या ३३ टक्के सेवा देण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अगेन अभियानांतर्गत या व्यवसायांना करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या अटी आणि शर्तींसह सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.