रत्नागिरीतील जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

मंडणगडमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर होणार एमआयडीसी; आंबेडकर जयंतीदिनी राज्यमंत्री कदम यांची घोषणा

आंबडवे : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. आज (१४ एप्रिल) सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आंबडवे गावी साजरी करण्यात आली.

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सुरू झाला अल्प दरातील वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष; उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : एमआयडीसीला लागून असलेल्या कोकणातील रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी येत्या महिन्याभरात सामंजस्य करार केला जाईल. जगातील चांगली रेल्वेस्थानके कोकणात तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर वातानुकूलित आलिशान प्रतीक्षा कक्षाचे (एसी एक्झिक्युटिव्ह लाउंज) उद्घाटन आज (२९ मार्च) संध्याकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाला चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा

रत्नागिरी : पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे.

उद्याचे कळले, आजचे काय?

राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस दर वर्षीपेक्षाही मोठ्या थाटात या वर्षी साजरा झाला. आपल्या आमदारकीच्या काळातील बहुतेक सर्व योजनांचा आढावा त्यांनी घेतला आणि भविष्याकरिता प्रामुख्याने काही कोटी रुपयांच्या पाणी योजना प्रस्तावित असल्याचे जाहीर केले. वाढदिवस हे केवळ निमित्त होते. विधानसभेची आगामी निवडणूक होण्यापूर्वीचा हा वाढदिवस असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. त्या निमित्ताने विकासकामांचा आढावा घेणे अत्यंत समयोचित होते. पण…

गणपतीपुळ्यात महिला बचत गटांना उत्पादनविक्रीसाठी सहा महिन्यांत कायमस्वरूपी स्टॉल; उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी तालुक्यातल्या गणपतीपुळे येथे आज (२५ डिसेंबर) विभाग आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.