बाटलीवाली!

स्वप्नांचा ऐन उमेदीत चुराडा होतो, तेव्हा मानवी मनाच्या संवेदना मूक होऊन जातात. मनातील साऱ्या इच्छा–आकांक्षा भोवऱ्याच्या वेगाने मेंदूला फिरवत राहतात. मनावर झालेल्या जबरदस्त आघातानंतर मेंदूवरील ताबा निघून गेलेल्या माणसाला आपण मनोरुग्ण असे म्हणतो. पण मनोरुग्ण असूनही कोणाजवळ हात पसरायचा नाही. कष्ट करून स्वतःचे पोट भरायचे, अशा भावना असणे म्हणजे ही बाटलीवाली बाई मनोरुग्ण होण्यापूर्वी संस्कारक्षम जीवन जगली असल्याचा पुरावाच म्हटला पाहिजे. समाजाने मनात आणले, अशा मनोरुग्णांना पुन्हा नक्कीच माणसात आणता येऊ शकेल.

शंभराव्या मनोरुग्णाला राजरत्नमुळे मिळणार शहाणपण

रत्नागिरी : वेड्यांना शहाणे करण्याचे व्रत रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने सहा वर्षांपूर्वी हाती घेतले. शंभरावा मनोरुग्ण उपचारांसाठी ताब्यात घेऊन आपल्या सामाजिक कार्याच्या ध्येयाची शतकपूर्ती केली आहे.

संगमेश्वरमधील स्वच्छतादूत मनोरुग्णांना राजरत्नने दिला मायेचा हात

संगमेश्वर : गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूचा कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृद्ध मनोरुग्णाला आणि तशाच स्वरूपाचे काम करणाऱ्या आणखी एका मनोरुग्ण महिलेला रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात भरती केले.

लॉकडाउनच्या काळात कोकणचा निसर्ग कुंचल्यातून उतरला कागदावर

पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.